Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

विरुद्धाहार म्हणजे कोणत्या दोन गोष्टी; एकमेकांना पचविणारे पदार्थ !

Spread the love

विरुद्धाहार म्हणजे कोणत्या दोन गोष्टी एकत्र खाल्ला की आरोग्याला अहितकर असतात असे अनेक वेळा सांगितले जाते. पण कोणत्या गोष्टी एकत्र घ्याव्या जेणेकरून पदार्थ पचण्यास मदत होईल. पदार्थाचे अजीर्ण होणार नाही. असा देखील संयोग आहारात करणे आवश्यक असते. काही अशाच एकमेकांना पचविणाऱ्या पदार्थांविषयी माहिती या लेखात घेऊया – दही – दही आंबट पचायला वेळ लागणारे असते. आपला एक गैरसमज आहे की दही थंड असते पण असे नाही. दही उष्ण आहे. रात्री दही खाऊ नये. रोज दही खाऊ नये.

दही कशासोबत खाल्ले की त्रास होत नाही तर साखर, मूगाचे वडे किंवा मूगाची दाळ, तूप, आवळा, मध या पदार्थासह दही असल्यास त्रास होत नाही. यावरून लक्षात आले असेल आपण जे पंचामृत बनवितो ते इतके गुणात्मक व त्याचा त्रास का होत नाही. मध तूप साखर दही एकत्र असल्यामुळे ते एकमेकांना पूरक आहेत.

असे हे विविध पदार्थाचा संयोग केल्यास एका पदार्थाचे अजीर्ण होत नाही. पाचन होण्यास मदत होते.

Exit mobile version